बुद्धिबळ
---------------------
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८ ८च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या पांढऱ्या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढऱ्या तर दुसऱ्या काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात. एक राजा, एक वजीर, दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी. प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतानी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
राजा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल “किल्लेकोट" करू शकतो. किल्लेकोटमध्ये राजा दोन घरे हत्तीच्या दिशेने जातो आणि हात्तीला राजाला लागून राजच्या पलीकडे सरकतो. जर राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हललेला नसेल, राजा हात्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल, राजा शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरातून सरकतो त्यावर विरोधी मोहरांच्या रोख नसेल आणि किल्लेकोट झाल्यानंतर राजा शहाच्या धाकाखाली येणार नसेल तरच किल्लेकोट करता येतो. किल्लेकोट झाल्यावर राजाला शह देणे अवघड होते.
हत्ती आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीह रिकामी घरे जाऊ शकतो. उंट तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्यामुळे मूळ पांढऱ्या घरातील उंट पांढऱ्या व दुसरा नेहमी काळ्या घरातून हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटापैकी एक पांढरा तर दुसरा काळ्याच घरात असेल.
पाद्यांच्या चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत. प्यादे एक घर पुढे रिकाम्या घरात सरकू शकते. जर प्याद्याची पहिलीच चाल असेल तर ते दोन रिकाम्या घरातून जाऊ शकते. प्यादे मागे जाऊ शकत नाही. जर प्याद्याने पहिली दोन घरांची चाल केली आणि त्याच्या शेजारील घरात जर विरोधी प्यादे असेल तर विरोधी प्यादे "एन पासंट" वापरून पहिले प्यादे मारू शकते. ही चाल जणू पहिले प्यादे एकच घर चालले असे मानून होते. हे फक्त दोन घरांच्या चालीनंतरच्या पहिल्या चालीवरच शक्य आहे. प्यादे फक्त विरोधी मोहरा मारण्यासाठीच एक घर तिरपी चाल करते. अन्यथा ते सरळ पुढे रिकाम्या घरात जाते. तिरपे घर रिकामे असले तरी तेथे जाऊ शकत नाही. जर प्यादे सरकत शेवटच्या पंक्तीत पोहोचले तर त्याला बढती मिळून खेळाडूच्या इच्छेनुसार ते वजीर, हत्ती, उंट किंवा घोडा बनू शकते. साधारणपणे खेळाडू वजीर करणे पसंत करतात.
वजीर आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. घोडा रिकाम्या किंवा भरलेल्या घरांवरून उड्या मारू शकतो तो दोन घरे आडव्या दिशेने आणि एक एकर उभ्या दिशेने आणि एक घर आडव्या दिशेने जातो.
बुद्धिबळाचा डाव 'शह' देऊन मात करणे या शिवाय अजूनही काही प्रकारे संपू शकतो. पटावर वाईट परिस्थिती असल्यास खेळाडू राजीनामा देतो (हार मान्य करतो.) किंवा डाव अनिर्णित राहू शकतो. अर्धवट मात, तीनदा पुनरावृत्ती, ५० चालींचा नियम किंवा शह देऊन मात न होण्याची शक्यता यापैकी एखादी गोष्ट असेल तर खेळ अनिर्णित ठरवला जातो.
0 Comments